अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशाप्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या ५० व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हींमधील सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं धनखड यांनी सांगितलं.

 
									 
		