हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत वचनबद्ध-राष्ट्रपती

भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेने ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत आयएसए अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या आठव्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या. हवामान बदलाचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी तातडीने आणि ठोस पावलं उचलण्याची गरज असून त्यासाठी सूर्य हा सौर उर्जेचा शाश्वत स्रोत महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

 

अनेक देशवासीय आज छठपूजेच्या निमित्ताने सूर्याचं पूजन करत आहेत. याच काळात सुरू झालेलं हे अधिवेशन म्हणजे खऱ्या अर्थाने सौर उर्जेसाठीच्या जागतिक सहकार्याचं प्रतीक असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. 

 

पुढचे चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात १२४ देशातले विविध विभागांचे प्रतिनिधी आणि ४०हून अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. सौर उर्जा क्षेत्रात जागतिक समुदायातलं सहकार्य वाढवण्यासाठी तसंच उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौरऊर्जेच्या वापराला गती देण्यासाठी तसंच सर्वांना परवडणाऱ्या दरात सौरऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.