डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मतदारांना प्रलोभन देण्याच्या कारवाईत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड जमा

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ तसंच मौल्यवान धातू जप्त केले असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे २८० कोटी रुपये, तर झारखंडमधून १५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आयोगानं कळवलं आहे.

 

दोन्ही राज्यांमधील यंदाच्या निवडणूक काळातली जप्ती ही २०१९च्या निवडणुक काळाच्या तुलनेत साडेतीन पटीनं जास्त असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. यंदाच्या जप्तीत सर्वाधिक चाळीस टक्के प्रमाण हे मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तूंचं असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.