रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल या ग्रामपंचायतींचा सत्कार केला. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे, त्यानुसार क्षयरोगमुक्त पंचायत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी यात सक्रीय सहभाग घेत मोहीम यशस्वी केली.