कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे- रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे; प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातलं कौशल्य असणं आवश्यक आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल संगितलं. जागतिक कौशल्य दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य आणि व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे विविध क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना तसंच उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना यावेळी पारितोषिकं देण्यात आली. या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.