नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जणांचा मृत्यू

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जण मृत्युमुखी पडले, तर ३८ जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागात या भूकंपाचे धक्के बसले. बिहारच्या काही भागात हे धक्के तीव्र स्वरूपाचे होते, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.