डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बहारिनमध्ये अटक २८ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले

बहारिनमध्ये अटक करण्यात आलेल्या २८ भारतीय मच्छिमारांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे. तमिळनाडूतल्या या मच्छिमारांना गेल्या सप्टेंबर महिन्यात बहारिनच्या सागरी हद्दीत अवैधरित्या प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी तिथल्या भारतीय दूतावासानं यशस्वी प्रयत्न केले. या सर्वांना अटकेत असताना दूतावासानं सर्व प्रकारची मदत केली तसंच भारतात परतण्याचा प्रवास खर्चदेखील केला.