डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आणि बचाव कार्यातल्या सुरक्षादलांनी  सुरक्षित स्थळी हलवलं आहे. महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.