November 22, 2025 7:56 PM

views 35

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी टन झाली आहे. रेल्वेद्...

November 22, 2025 7:27 PM

views 23

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं – मंत्री नितीन गडकरी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. 'संत्रा: स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ' या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते ...

November 22, 2025 7:20 PM

views 43

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन लवकरच होणार

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाऊंडेशन आर्थक सहाय्य करणार आहेत. जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरूज्जीवर य...

November 22, 2025 7:16 PM

views 37

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्...

November 22, 2025 7:13 PM

views 37

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.

November 22, 2025 7:00 PM

views 65

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ ...

November 22, 2025 6:10 PM

views 15

जगभरातल्या भाषांमधलं नोबेलप्राप्त साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं-ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस

'मराठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार, तसंच नोबेलप्राप्त साहित्य लगेच मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती...

November 22, 2025 6:04 PM

views 34

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या...

November 22, 2025 5:51 PM

views 18

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 4:04 PM

views 22

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.