November 30, 2025 7:46 PM

views 36

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. तीव्र इच्छा, सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भा...

November 30, 2025 7:25 PM

views 14

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी केलं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या २७ जणांवर ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पूना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत. या सर्वांना छत्तीसगढ रा...

November 30, 2025 7:19 PM

views 25

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं पटकावलं

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडगोळीनं पटकावलं आहे. लखनौमधे झालेल्या अंतिम सामन्यात आज त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जोडीचा १७-२१, २१-१३, आणि २१ -१५ असा पराभव केला.

November 30, 2025 7:14 PM

views 28

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली. येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता  

November 30, 2025 7:45 PM

views 24

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची...

November 30, 2025 7:09 PM

views 38

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याच...

November 30, 2025 7:03 PM

views 21

नांदेड जिल्ह्यातील्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात असलेल्या कृष्णूर एमआयडीसीतल्या कामगारांवर काल बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कामगार जखमी झाला. त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कामगारावरही बिबट्यानं हल्ला चढवला आहे. या परिसरात बिबट्यामुळे भितीचं वातावरण असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आ...

November 30, 2025 7:48 PM

views 162

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तसंच प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे.   बीड जिल...

November 30, 2025 7:44 PM

views 44

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा एफआयआर नोंदला आहे. काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा...

November 30, 2025 7:01 PM

views 55

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३४९ ...