October 24, 2025 8:19 PM

views 45

आंध्रप्रदेशात बस अपघातात २० जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये कुर्नुल इथे आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही खाजगी बस दुचाकीला धडकल्यानंतर तिनं पेट घेतला. बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवाशी बाहेर पडू शकले नाहीत.बसमध्ये ४१ प्रवासी होते, त्यातल्या २१ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्...

October 24, 2025 3:05 PM

views 41

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं-डॉ. एस जयशंकर

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं असून संयुक्त राष्ट्रसंघानही त्याला पाठिंबा द्यायला हवा. असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिल्लीत त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. त...

October 24, 2025 3:04 PM

views 79

भारतीय कबड्डी संघानं पटकावलं सुवर्ण पदक

बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी युवा स्पर्धांमध्ये १८ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. मुलींच्या संघानं इराणला ७५-२१ असं १२ वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं. मुलांच्या संघानं इराणला ३५-३२ असं हरवलं.  या स्पर्धेत मुलींच्या १०० मीटर अडथळ्यांच्या धावण्य...

October 24, 2025 2:53 PM

views 39

थंडीची पूर्वतयारी करावी अशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचना 

हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन त्यासाठी पूर्वतयारी करावी असी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १९ राज्य सरकारे आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे ३ हजार ६३९  मृत्यूंची नोंद झाल्...

October 24, 2025 2:47 PM

views 13

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य- मनोहरलाल

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील १ कोटी मीटर बसवण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील. त्याचप्रमाणे ते आपला वीजेच्या वापर नियंत्रि...

October 24, 2025 2:42 PM

views 91

जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं निधन

आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत आज सकाळी निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने आजारी होते.    ऑगिल्व्ही या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना २०१६ साली पद्मश्री ने सन्मानित करण्यात आलं होत.    भारतीय जनता पक्...

October 24, 2025 1:38 PM

views 134

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल २ अपत्यांचा निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय

तेलंगणाच्या मंत्रिमंडळानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे. याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं तेलंगणा मंत्रिमंडळानं तेलंगणा पंचायत राज अधिनियम, २०१८ च्या कलम २१ च्या पोटकलम ३ मध्ये सुधारणा करायला काल...

October 23, 2025 2:53 PM

views 21

गाझामधे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी इस्राएलवर-आंतरराष्ट्रीय न्यायालय

गाझामधे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी इस्राएलवर असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे. गाझातल्या नागरिकांचं अन्न तोडण्याचा मार्ग युद्ध जिंकण्यासाठी वापरता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. ११ न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला. नागरिकांच्या अन्न, पाणी,...

October 23, 2025 2:51 PM

views 170

कबड्डीमध्ये भारताची गुणतालिकेत आघाडी

कबड्डीमध्ये, भारताने काल इसा स्पोर्ट्स सिटी हॉल येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरीनचा 84-40 असा पराभव केला. इशांत राठीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्य...

October 23, 2025 2:49 PM

views 323

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून निवडण्यात आलं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी ६ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान इटलीत मिलान आणि कोर्टिना डी अमपेत्झो इथे होणार आहे. या स्पर्धेसाठी मशालवाहक म्हणून आपली निवड होणं हा आपला ...