November 12, 2025 7:41 PM

views 15

Archery Championships: भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा अंतिम फेरीत

ढाका इथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड मिश्र प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी कझाकस्तानचा १५६-१५३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  सुवर्ण पदकासाठी उद्या भारताचा सामना बांगलादेशशी होईल. रिकर्व्ह प्रकाराच्या सांघिक स्पर्धेत अंशिका कुमारी आणि यशदीप भोग...

November 12, 2025 7:41 PM

views 24

भारत आणि मॉरिशसचं मासेमारी, सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण क्षेत्रात सहकार्य व्हावं-डॉ. जितेंद्र सिंग

मासेमारी ,सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण यासारख्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशस या दोन्ही राष्ट्रांत अधिक गहिरं सहकार्य व्हावं असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे.  जेष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या क्षमता वृद्धी कार्यक्रमात मॉरिशसच्या प्रतिनिधींसमोर ...

November 12, 2025 7:17 PM

views 33

रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्यशासनाचं नवीन धोरण जाहीर

रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्यशासनाने नवीन धोरण जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या धोरणाचा शासननिर्णय आज जारी झाला. या क्षेत्रात पुढच्या ५ वर्षांच्या कालावधीत एक लाख कोटी रुपये गुंतवणूक  ५ लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. देशाच्या एकूण रत्न आणि आभूषण क्षेत्रात महाराष्ट्राच...

November 12, 2025 7:11 PM

views 23

प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली. गेल्या सोमवारी लालकिल्ल्याजवळ स्फोटात जखमी झालेल्यांची त्यांनी विचारपूस केली. रुग्णालयातल्या अधिकारी आणि डॉक्टरांकडून त्यांनी उपचारांविषयी माहिती घेतली. या स्फोटामागे असलेल्यांना न्यायालयात उभं केलं जाईल...

November 12, 2025 7:01 PM

views 29

पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी

केंद्रसरकारने पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर पेक्षा जास्त असून, तो पूर्ण झाल्यावर फिरोजपूर आणि अमृतसर दरम्यानचं  अंतर १९६ किलोमीटरवरून सुमारे १०० मीटर, इतकं कमी होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज चंदीगड इथं...

November 12, 2025 6:56 PM

views 29

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया-कृषी मंत्री

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चात्य देशांच्या उदयापूर्वीच भारतानं  विविध पिकांचं बीज विकसित केलं होतं असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वनस्पती प्रजाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला स...

November 12, 2025 6:50 PM

views 23

बलुचिस्तानमध्ये नागरिक बेपत्ता होण्याचं आणि न्यायबाह्य हत्यांच्या प्रमाणात वाढ

बलुचिस्तानमध्ये नागरिक बेपत्ता होण्याचं आणि न्यायबाह्य हत्यांचं प्रमाण वाढलं असून, पाकिस्तानकडून होत असलेल्या साधन संपत्तीच्या वाढत्या शोषणाशी याचा संबंध स्पष्ट होत असल्याचं ‘बलोच ऍडव्होकसी अँड स्टडीज सेंटर’ च्या  अहवालात म्हटलं आहे.  यानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात बलुचिस्तानमध्ये ८२४ नागरिक...

November 12, 2025 6:44 PM

views 83

देशाचा किरकोळ महागाईचा ऑक्टोबर महिन्याचा दर पाव टक्क्यावर

देशाचा किरकोळ महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन पाव टक्क्यावर आला. २०१५ सालापासूनचा हा ग्राहक भाव निर्देशांकावर आधारित सर्वात नीचांकी दर आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी होऊन तो ग्रामीण भागात पाव टक्के, तर...

November 12, 2025 6:38 PM

views 22

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर सूक्ष्म अंमलबजावणीचे मुख्य सचिवांचे निर्देश

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथल्या व्यवस्था ठरवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मुख्य ...

November 12, 2025 6:29 PM

views 23

आरोग्य मंत्रालयाची हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांसाठी हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.  यानुसार सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधे चेस्ट क्लिनीक उभारायला सांगितलं आहे. तसंच नागरिकानी अति प्रदूषण असलेले रस्ते, अति वर्दळी...