डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गेल्या ११ वर्षात भारतात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात भारतानं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल घडवला आहे. आज आपण पाहणार आहोत ऊर्जा क्षेत्रात गेल्या दशकभरात झालेली क्रांती. 

 

गेल्या दशकभरात भारतातल्या उर्जाक्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात नवीकरणीय आणि अपारंपरिक उर्जास्रोतांचा मोठा वाटा आहे. जून २०२५ पर्यंत देशाची एकूण उर्जाउत्पादन क्षमता ४७६ गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे.

 

सौर उर्जेच्या बाबतीत भारताचा आता जगात तिसरा क्रमांक लागतो तर पवन उर्जेच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एप्रिल २०१८ पर्यंत देशातल्या १०० टक्के खेड्यांपर्यंत वीज पोहोचली. त्यात २ कोटी ८० लाख घरांचा समावेश आहे. वीज टंचाई दूर झाली. विजेचा दरडोई वापर ४५ टक्क्यांनी वाढला आहे.

 

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमुले शेतकऱ्यांना उर्जानिर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे. दरम्यान कोळसा उत्पादन क्षेत्राचंही आधुनिकीकरण झालं असून त्यावरचं अवलंबित्व आणि ताण कमी झाला आहे. एकूणच स्वच्छ आणि हरित उर्जा उत्पादनाच्या दिशेने भारताची दमदार वाटचाल सुरु आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा