मध्य प्रदेशात बालाघाट जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. त्यात ७७ लाख रुपयांच बक्षीस असलेल्या सुरेंदर उर्फ कबीर या नक्षलवादी नेत्याचा समावेश आहे. नक्षलवादाचं संपूर्ण निरमूलन करुन मध्य प्रदेशाला नक्षलमुक्त करमं हे राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यावेळी सांगितलं. पुनर्वसन धोरणामुळे, वाट चुकलेल्या लोकांना सन्मानाचं आयुष्य जगण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | December 7, 2025 8:10 PM | Madhya Pradesh | Naxalites Surrender
मध्य प्रदेशात १० नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण