डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 29, 2024 3:28 PM | Jayant Patil

printer

राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची जयंत पाटील यांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या केल्याच्या घटनेवरून राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यातल्या महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हतेच पण आता राज्यातले शासनाचे अधिकारी सुरक्षित नसल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.