June 27, 2024 11:14 AM

printer

पुणे जिल्हयात १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी- पुणे कृषी विभाग

पुणे जिल्हयाच्या पूर्व भागातील तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी अन्य तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळं किमान १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला पुणे कृषी विभागानं दिला आहे.मावळ तालुक्यात भात या मुख्य पिकाबरोबरच सोयाबीन,भूईमूग आणि इतर कडधान्यांची लागवड केली जाते.भाताची १३ हजार हेक्टरवर लागवड होणार असून सोयाबीनची ५५० हेक्टरवर लागवड होणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं पूर्ण तयारी केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.