डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 1, 2024 2:20 PM | Army Chief | China

printer

चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

चीनसोबत एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य झालेली नाही असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एप्रिल २०२० पूर्वी होती तशी स्थिती पूर्ववत करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं. ही परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारत कोणत्याही स्थितीला तोंड द्यायला तयार आहे, असंही लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितलं.