डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली. शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विमा काढण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून  शेतकऱ्यांनी त्यापूर्वी  पीक विमा भरून घ्यावा, असं आवाहन कृषिमंत्र्यांनी केलं आहे. खरीप हंगामासाठी  भात, ज्वारी, सोयाबीन,कापसासह एकूण १४ पिकांचा विमा योजनेत समावेश  करण्यात आला आहे.