डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2025 9:28 AM | Asia Cup Cricket

printer

आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत-पाकिस्तान दरम्यान होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत काल पाकिस्ताननं बांगलादेशचा १४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ १२४ धावा करू शकला. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात परवा २८ तारखेला खेळला जाईल.