भंडारा जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले आहेत. लाखनी तालुक्यात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

नांदेड इथल्या विष्णुपूरी प्रकल्पाचा १ दरवाजा उघडला असून प्रकल्पातून १५ हजार २९७ क्युसेस पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.