पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या २ दिवसात महाराष्ट्रातले सुमारे ८०० पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली होती, त्यातून १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले.
आणखी २३२ प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातला कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
राज्यात परतलेल्याल्या पर्यटकांना मुंबईहून त्यांच्या मूळ गावी वातानुकूलित शिवनेरी बसने पाठवण्याची सोय एसटी महामंडळाकडून करण्यात आली. मुंबई विमानतळावर या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी बसेस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.