खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालच पदकांचं अर्धशतक पूर्ण केलं, आणि आतापर्यंत २३ सुवर्ण, १९ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकंदर ५८ पदकं पटकावत पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. (कर्नाटक ३१ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर, तर पंजाब आणि हरियाणा प्रत्येकी २२ पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहेत.)
नेमबाजी स्पर्धेत, महाराष्ट्राच्या पार्थ माने आणि शांभवी क्षीरसागर यांनी १० मीटर एअर रायफल युवा गटाच्या मिश्र संघामध्ये सुवर्णपदक पटकावलं. या नेमबाजी स्पर्धेत शांभवीचं दुसरं सुवर्णपदक आहे. खो-खो मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी करत सलग ७ व्यांदा सुवर्ण पदक पटकावलं, तर मुलींच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
पुरुष आणि महिला अशा दोन्ही सामन्यात महाराष्ट्राला ओडिशा बरोबर लढत द्यावी लागली होती. कर्णधार राज जाधवच्या नेतृत्वाखाली मुलांच्या संघानं ओडिशाला ३४-२५ असं नमवून ९ गुणांनी विजय मिळवला. मुलींच्या संघाला मात्र अंतिम फेरीत ओडिशाकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे अंतिम सामना चुरशीचा झाला.