December 12, 2024 2:21 PM

views 31

२०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतरिक्ष स्टेशन असेल – डॉ. जितेंद्र सिंह

भारताची २०३५ पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचं अंतराळस्थानक उभारण्याची योजना आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल सांगितलं. भारताची २०४० पर्यंत चंद्रावर उतरण्याचीही योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीत विज्ञान क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांच्या आजवरच्या कामगिरीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं अंतराळ क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत ४३२ परदेशी उपग्रह भारतातून प्रक्षेपित केले असल्याचं ते म्हणाले आणि त्य...