August 14, 2025 8:25 PM

views 28

पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

भारताविरुद्ध युद्धखोर, द्वेषपूर्ण आणि निष्काळजी वक्तव्यं करणं ही पाकिस्तानच्या नेत्यांची सवय असून पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. अशी आगळीक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे भारतानं अलिकडेच दाखवून दिलं आहे, असंही ते म्हणाले.   सिंधू जल कराराविषयी लवादाने दिलेला निर्णय भारत नाकारतो, भारतानं या लवादाला कधीच वैध मानलं नाही असं जयस्वाल म्हणाले.   भारत-अमेरिक...

May 13, 2025 7:40 PM

views 43

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका कायम – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका अनेक वर्षांपासून कायम असून हे प्रश्न भारत आणि पाकिस्तानला सोडवावे लागतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या काश्मीरची सुटका हा प्रलंबित मुद्दा असल्याचं जयस्वाल म्हणाले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून शस्त्रसंधी होईपर्यंत भारत आणि अमेरिकेत चर्चा सुरू होती, मात्र यात व्यापाराचा मुद्दा नव्हात असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ...