भारत आणि ब्राझीलने शँग्रीला संवाद २०२५ च्या माध्यमातून मुक्त, खुली आणि समावेशक इंडो पॅसिफिक वचनबद्धता कायम राखत द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि ब्राझील सशस्त्र दलांचे प्रमुख ऍडमिरल ऍग्वार फ्रेयर यांनी सामायिक मूल्ये आणि हितसंबंधांबाबत चर्चा करताना नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे महत्त्व आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील विचारांची वाढती एकात्मिकता अधोरेखित केली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी प्रादेशिक सुरक्षा, सागरी स्वातंत्र्य आणि शाश्वत विकासावर भर दिला.
Site Admin | May 31, 2025 12:29 PM | India-Brazil | ShangriLa Dialogue 2025
ShangriLa Dialogue 2025 : भारत – ब्राझीलमध्ये द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर भर
