भारतातलं सर्व प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेत असल्यानं लोकांनी संस्कृत भाषा शिकायची आणि तिचा सराव करायची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. संस्कृत भारती आयोजित ‘१००८ संस्कृत संभाषण शिबिरांच्या’ समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना शाह बोलत होते.
२३ एप्रिल ते ३ मे या कालावघीत संस्कृत भारतीनं नवी दिल्लीत संस्कृतची संभाषणांची १००८ शिबिरं आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये २५ हजार जणांनी भाग घेतला.