पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित हवाई दल मार्शल अर्जन सिंह स्मृती व्याख्यान कार्यक्रमात व्याख्यान दिलं.
त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता हेच भारताचं धोरण आहे, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना प्रत्युत्तर देताना सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असं ते म्हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध करत पिडित कुटुंबांप्रति सहवेदनाही व्यक्त केल्या.