वाहन उत्पादन क्षेत्रात जगात तिसरं स्थान मिळवलं भारतानं वाहन उत्पादन क्षेत्रात जगात तिसरं स्थान मिळवलं आहे, असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं.
ते नवी दिल्लीत आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते. देशाच्या मोटारवाहन क्षेत्रात सतत वृद्धी होत आहे, वेगवेगळ्या वाहनांची मागणी वाढत आहे, त्याचप्रमाणे जीवाष्म इंधनाचा वापरही वाढत असल्याचं ते म्हणाले.