डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस – परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. आर्क्टिक प्रदेशातल्या घडामोडी, जागतिक राजकारण, व्यापार आणि शाश्वततेत आशिया खंडाची वाढती भूमिका लक्षात घेऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत आयोजित ‘आर्क्टिक सर्कल इंडिया फोरम २०२५’मध्ये ते आज बोलत होते.

 

युरोपवर बदलाचा दबाव आहे आणि या बदलांमुळे बहुध्रुवीयतेचं वातावरण तयार होत आहे. केवळ जगाला शिकवणूक देऊन स्वत:च्या घरी मात्र, त्या बाबी आचरणात न आणणारे बरेच असले, तरी, भारताला अशांची नाही, तर एका चांगल्या भागीदाराची गरज आहे, आणि युरोप हा त्याकरता एक चांगला पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताला भागीदारी विकसित करायची असेल, तर परस्पर हितसंबंध जपणं आणि जगात नेमकं काय सुरु आहे, याची जाणीव असणं आवश्यक आहे, याचं भान असल्याचं ते म्हणाले.

 

आर्क्टिक प्रदेशाला स्वतःचं असं जागतिक महत्त्व असून या प्रदेशातला भारताचा सहभाग वाढत असल्याचं सांगून आर्क्टिकमध्ये घडणाऱ्या घडामोडी केवळ भारतासाठी महत्त्वाच्या नसून त्यांचे परिणाम हे संपूर्ण जगावर होणार असल्यानं सरकारनं काही वर्षांपूर्वी भारतानं आर्क्टिक धोरण आणल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा