उडान योजने अंतर्गत १ कोटी ४९ लाख प्रवाशांना परवडणाऱ्या दरात देशांतर्गत हवाई प्रवास उपलब्ध झाला आहे, असं हवाई वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे.
सध्या देशात ६२५ उडान मार्गांनी ९० विमानतळं जोडली आहेत. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळं होती, ही संख्या २०२४ मध्ये दुप्पटीपेक्षा जास्त होऊन १५९ विमानतळं इतकी झाली आहे.